प प्रतिनिधी
मुंबई
मुंबईत अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या निविदांमध्ये गैरव्यवहार झालेला नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र काही चुकीच्या पद्धतीने घेतलेले निर्णय दुरुस्त करण्याची गरज आहे, असे अशोक चव्हाण यांनी बुधवारी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
भाजप सरकार असताना वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात घोटाळा झाल्यांची बोंब होत असे. आज स्मारकाचा विषय विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात चर्चेला आला यावेळी याबबात बोलताना अशोक चव्हाण यांनी शिवस्मारकांच्या निविदांमध्ये गैरव्यवहार नसल्याचे सांगितले.
कंत्राटाची किंमत 2 हजार 581 कोटींसह जीएसटी अशी निश्चित करण्यात आली. त्यामुळे या निविदांमध्ये कोणताही गैरव्यवहार नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तत्कालीन सरकारने लार्सन अँड टूबरो कंपनीशी वाटाघाटी करुन स्मारकाच्या कंत्राटाची रक्कम अडीच हजार कोटींपर्यंत कमी केल्याचं दाखवून स्मारकाच्या मूळ संरचनेत बदल केला आहे का? असा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेच्या हेमंत टकले यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण बोलत होते.
मुंबई
मुंबईत अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या निविदांमध्ये गैरव्यवहार झालेला नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र काही चुकीच्या पद्धतीने घेतलेले निर्णय दुरुस्त करण्याची गरज आहे, असे अशोक चव्हाण यांनी बुधवारी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
भाजप सरकार असताना वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात घोटाळा झाल्यांची बोंब होत असे. आज स्मारकाचा विषय विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात चर्चेला आला यावेळी याबबात बोलताना अशोक चव्हाण यांनी शिवस्मारकांच्या निविदांमध्ये गैरव्यवहार नसल्याचे सांगितले.
कंत्राटाची किंमत 2 हजार 581 कोटींसह जीएसटी अशी निश्चित करण्यात आली. त्यामुळे या निविदांमध्ये कोणताही गैरव्यवहार नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तत्कालीन सरकारने लार्सन अँड टूबरो कंपनीशी वाटाघाटी करुन स्मारकाच्या कंत्राटाची रक्कम अडीच हजार कोटींपर्यंत कमी केल्याचं दाखवून स्मारकाच्या मूळ संरचनेत बदल केला आहे का? असा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेच्या हेमंत टकले यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण बोलत होते.